Tuesday, August 12, 2014

साखर-खडकवाडी मध्ये कोसळली दरड

साखर-खडकवाडी मध्ये कोसळली दरड

पोलादपूर(नितीन कळंबे)- पोलादपूर पासून सुमारे बारा किलोमीटर असलेल्या खडकवाडी या गावात सकाळी नऊच्या सुमारास दरड कोसळली.

दरड कोसळल्यावर वरून वाहून आलेली माती आणि दगड रस्त्यालगत विखुरले तर काही झाडे रस्त्यावरच आडवी पडली.कामथे,वडघर,आडवळे,मोरसडे गावांकडे होणाऱ्या वाहतुकीला अडथळा निर्माण झाला.शाळांवर जाणारे शिक्षक, कर्मचारी,तालुक्याच्या ठिकाणी जाणारे प्रवासी यामुळे अडकून पडले.सदर परिस्थिती लक्षात घेऊन खडकवाडी येथील शिवमुद्रा प्रतिष्ठान चे कार्यकर्ते अनिल मालुसरे यांनी गावकऱ्यांना मदतीस घेऊन रस्त्यावर आलेली झाडे आणि दगड हटवण्याचे काम हाती घेतले गावकऱ्यांच्या मदतीने झाडे तोडून हा मार्ग तासाभरातच मोकळा केला गेला.  

रायगड नगरी


Sunday, August 10, 2014

News by Nitin Kalambe in Raigad Nagari(10-8-2014)


Yashavant English medium school Poladpur ..News by Nitin kalambe in Pudhari and Raigad Nagari(10-8-2014)


News of "Tapaal" movie from Laxman Utekar and Mangesh Hadwale by Nitin Kalambe in Raigad Times


News by Nitin Kalambe in Pudhari(10-8-2014)


आखिल भारतीय मराठा महासंघ पोलादपूर कार्यकारिणी निवड सभा संपन्न

आखिल भारतीय मराठा महासंघ पोलादपूर कार्यकारिणी निवड सभा संपन्न

पोलादपूर(नितीन कळंबे)दि.१०-आखिल भारतीय मराठा महासंघ पोलादपूर कार्यकारिणी निवड सभा महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष प्रा.देसाई सर यांच्या उपस्थितीत पार पडली.

पोलादपूर तालुका अध्यक्ष पदावर कोंढवी येथील तरुण कार्यकर्ते श्री.दिनेश शंकर निकम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.उपाध्यक्ष पदावर कोतवाल पंचक्रोशीतील श्री.महेश मनोहर दरेकर तसेच बोरघर येथील श्री.विठ्ठल दगडू पार्टे यांची निवड करण्यात आली.कोंढवी विभागातून देवपुरचे श्री.महादेव धोंडू शिंदे यांची खजिनदार पदी,श्री.भरत चिमाजी चोरगे(साखर),श्री.राजेश रामचंद्र डांगे(कापडे विभाग) यांची सरचिटणीस पदावर निवड करण्यात आली.श्री.संतोष विक्रमराव मोरे(पैठण),श्री.अनंत विठ्ठल घाडगे(करंजे),श्री.विठ्ठल रघुनाथ भिलारे(दिवील),श्री.रवींद्र नारायणराव मोरे(कोंढवी),श्री.मंगेश राघोबा पवार(पार्लेवाडी),यांची जनसंपर्क प्रमुख पदावर निवड करण्यात आली.कर्तव्यदक्ष कार्यकर्त्यांच्या निवडीमुळे संघटनेची आगामी वाटचाल यशस्वी होईल असा विश्वास हितचिंतक,कार्यकर्ते,पदाधिकार्यांनी व्यक्त केला.

पोलादपूर तालुका वाचनालयातर्फे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पोलादपूर तालुका वाचनालयातर्फे वक्तृत्व स्पर्धा संपन्न

पोलादपूर (नितीन कळंबे)दि.८ – दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी पोलादपूर तालुका वाचनालयातर्फे होणारी तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडली.
स्पर्धेत सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रथम शाळेकडून निवड केली गेली होती.”क्रांतिवीर” हा विषय असलेल्या या स्पर्धेत तालुक्यातील १० शाळांचा समावेश होता.ही स्पर्धा पाचवी,सहावी आणि सातवी अशा तीन गटात घेतली गेली.यापैकी पाचवी मध्ये जनसेवा प्रतिष्ठान शाळेची कु.सानिका विकास कोसबे हिचा प्रथम क्रमांक,सहावी मध्ये  शंकरराव महाडिक शाळेची कु.नताशा नितीन बोरकर हिचा प्रथम क्रमांक तर सातवी मध्ये रा.जि.प.शाळा चरई ची कु.साक्षी संजय कांबळे हिने प्रथम क्रमांक पटकावला.प्रथम क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यास मनगटी घड्याळ,द्वितीय क्रमांकास कंपासपेटी तर तृतीय क्रमांकास मराठी,इंग्रजी व हिंदी भाषेतील निबंध पुस्तके असे बक्षिसांचे स्वरूप होते.

सदर स्पर्धेचे परीक्षक म्हणून एस.एम.महाविद्यालयाचे प्रा.सोमोशी सर,विद्यामंदिर माध्यमिक शाळेच्या पर्यवेक्षिका सौ.अस्मिता तलाठी यांनी काम पहिले.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सुरेश रा.शेठ यांनी भूषविले तर सूत्रसंचालन जगन्नाथ मुजुमले गुरुजींनी केले.स्पर्धेचे नियोजन ग्रंथपाल निकिता शेठ,लिपिक संतोष महाडिक,शिपाई कीर्ती नगरकर ,सदस्या प्रेमलता शेठ यांनी केले.

श्री.बी.एल.भोसले-माजी सैनिकांचे आधारस्तंभ

श्री.बी.एल.भोसले-माजी सैनिकांचे आधारस्तंभ

पोलादपूर(नितीन कळंबे)- आजी व माजी सैनिकांच्या उन्नतीसाठी जीवन वाहून घेतलेले,सैनिकांचे आधारस्तंभ श्री.बी.एल.भोसले यांचे ३० जुलै २०१४ रोजी वयाच्या ८६ व्या वर्षी दुख:द निधन झाले.तालुक्यात पावसाची संततधार सुरु असतानादेखील त्यांच्या अंत्यसंस्कारासाठी समाजातील सर्व स्तरातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बी.एल.भोसले यांचे मातृछत्र बालपणीच हरवले तर वयाच्या बाराव्या वर्षी त्यांचे वडील निवर्तले परंतु ठायीच्या प्रचंड इच्छाशक्तीमुळे त्यांनी दिवसा काबाडकष्ट करून,रात्रशाळेत शिकून ते मेट्रिक इंग्रजीमधून उत्तीर्ण झाले.बालपणापासूनच त्यांना देशसेवेची आवड असल्यामुळे ते सैन्यदलात बी.ई.जी.मध्ये दखल झाले.आपली बुद्धिमत्ता,कौशल्य आणि शिस्तपालन या अंगभूत गुणांनी त्यांनी थोड्याच अवधीत वरिष्ठांची मर्जी संपादन केली.त्यानंतर त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या कोयना प्रकल्पावर ट्रेझरी पदी सेवेला आरंभ केला.देशसेवा करीत असतानाच माजी सैनिक,सैनिकांच्या विधवा पत्नी तसेच त्यांच्या कुटुंबियांच्या प्रश्नांबाबत त्यांनी प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे त्यांना न्याय देण्यासाठी ते प्रेरित झाले.सन १९५७ साली त्यांनी “खेड तालुका माजी सैनिक संघटने”ची स्थापना केली व खऱ्या अर्थाने माजी सैनिकांच्या सेवेला सुरुवात केली.त्यांनी या कामात स्वत:ला झोकून दिले.प्रसंगी स्व:खर्चाने पिडीत माजी सैनिकांना,त्यांच्या विधवा पत्नींना,कुटुंबियांना पेन्शन तसेच इतर आर्थिक मदती मिळवून दिल्या.शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून त्यांचे पुनर्वसन केले.सैनिकांच्या मुलांच्या वसतिगृहाची सुधारणा करणेसाठी शासनदरबारी पत्रव्यवहार करून वसतीगृहाची सुधारणा करून घेतली.माजी सैनिकांना तालुक्याच्या ठिकाणी कामानिमित्त आल्यानंतर त्यांना विश्रांतीगुह असावे या उद्देशाने त्यांनी शासनदरबारी आवाज उठवून सैनिकी विश्रामगृह बांधण्यास शासनाला भाग पाडले.माजी सैनिकांसाठी काम करताना त्यांना जाणवले कि महाराष्ट्रात माजी सैनिकांच्या पन्नास विविध संघटना आहेत.या सर्व संघटना जर एकाच छताखाली आल्या तर शासनदरबारी माजी सैनिकांच्या पप्रश्नांबाबत,त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात झगडण्यास बळ मिळेल या उद्देशाने त्यांनी १९७४ साली “महाराष्ट्र राज्य आजी व माजी सैनिक संघटनेची” स्थापना केली व संघटनेच्या राज्यभर तेरा शाखांची स्थापना केली.या संघटनेच्या माध्यमातून ७ डिसेंबर १९७५ मध्ये देशसेवा करून तारुण्याचे बळ देशासाठी वाहणाऱ्या व वेळ पडल्यास भारत मातेच्या रक्षणासाठी रक्त सांडवणाऱ्या सैनिकांच्या निवृत्ती नंतर त्यांना समाजात मनाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी हुतात्मा चौक,मुंबई येथे लाक्षणिक उपोषण केले व माजी सैनिकांच्या उत्कर्षासाठी तेवीस विविध मागण्यांचे निवेदन सरकारला दिले.त्यांनी माजी सैनिकांच्या गृहनिर्माण प्रकल्पासाठी निवासी जागा गोरसई,ता-वाडा येथे माजी सैनिकांच्या पुनर्वसनासाठी १०३ एकर जागा मिळवून दिली.उचाट येथील शाळेसाठी सैनिक कल्याण निधी मधून निधी मिळवून दिला तसेच पोलादपूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या इमारतीच्या बांधकामासाठी त्यांनी तीन लाख रुपयाचा निधी सैनिक कल्याण निधी मधून मिळवून दिला.परंतु हा निधी प्राप्त होऊन सुद्धा शाळा व्यवस्थापनाने दीर्घकाळ याचा पत्ताच लागू दिला नाही.जेव्हा तत्कालीन खासदार सुधीर सावंत यांनी बी.एल.भोसले यांना फोन वरून निधी दिल्याचे सांगितले तेव्हा त्यांना वाईट वाटले.ज्यांच्या प्रयत्नामुळे निधी मिळाला त्यांनाच निधी मिळाल्याचे कळवले देखील नाही याचे शल्य त्यांच्या मनात अखेरपर्यंत राहिले.    
माजी सैनिकांना मानाने जगाविण्यासाठी,त्यांना पेन्शन साठी कोणापुढेही हात पसरावे लागू नये यासाठी त्यांनी “रायगड जिल्हा सैनिक सहकारी पतसंस्थे”ची स्थापना केली व तिचे काही काळ चेअरमन पदहि भूषविलेया काळात त्यांनी माजी सैनिकांची गरज संस्थेच्या माध्यमातून भागवलीच परंतु सामाजिक जाणीवेतून कारगिल युद्धात धरातीर्थ पडलेल्या सैनिकांच्या कुटुंबियांसाठी त्यांनी पतसंस्थेच्या माध्यमातून शासनाला मदतीचा हात दिला.
खोपी शिरगाव येथील लघु-पाटबंधारे प्रकल्पामुळे अनेक ग्रामस्थांच्या जमिनी बुडीत क्षेत्रात गेल्या या प्रकल्पग्रस्तांना एकत्र करून त्यांना पुनर्वसन कायद्याच्या नियमानुसार लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी “डुबी प्रकल्प संघर्ष समिती”ची स्थापना केली व त्या माध्यमातून शासनदरबारी  प्रश्न मांडून प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला.राजे शिवछत्रपती यांचा अश्वारूढ पुतळा पोलादपूर येथे स्थापन करण्यासाठी त्यांनी “शिवछत्रपती प्रतिष्ठान” ची स्थापना करून प्रमुख कार्यवाह पदाची सूत्रे सांभाळली.
रायगड जिल्हा भूतपूर्व सैनिक काँग्रेस (इं.) याचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले.सन १९९० मध्ये राज्याचे गृह व सैनिक कल्याण राज्यमंत्री ना.अरुणभाई मेहता .मा.आमदार कर्नल आर.डी.निकम यांच्या उपस्थितीत पोलादपूर येथे माजी सैनिकांच्या न्याय्य हक्कासाठी मेळावा आयोजित केला होता.या मेळाव्यात पाच हजारापेक्षा जास्त सैनिकांनी उपस्थित राहून त्यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला होता. या मेळाव्यात गरजू माजी सैनिकांना आर्थिक मदतीचे वाटप करण्यात आले.बी.एल.भोसले यांच्या दिव्य कार्य पाहून मा.खासदार सुधीरजी सावंत यांनी त्यांच्यावर “महाराष्ट्र प्रदेश सैनिक काँग्रेस”च्या उपाध्यक्षपदाची धुरा सोपवली.या काळात दहशतवादी कारवाया थांबवण्याच्या दृष्टीने माजी सैनिकांचा वापर करण्याच्या दृष्टीने  शासनाकडून राबवण्यात आलेल्या योजनेला बी.एल.भोसले यांनी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन संघटनेच्या माध्यमातून दिले.
सन १९९५ च्या विधानसभा निवडणुकीत माजी सैनिकांचे प्रतिनिधित्व करण्याच्या दृष्टीने त्यांनी महाड-पोलादपूर मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवली.सैनिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी त्यांनी “रक्षक” हे मासिक सुरु केले.किल्लारीच्या भूकंपग्रस्तांना त्यांनी १०००० रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीसाठी तत्कालीन तहसिलदारांकडे सुपूर्द करून सामाजिक बांधिलकी जपली होती.त्यांच्या पश्चात त्यांचे पुत्र श्री.अनिल भोसले (सचिव,पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस),श्री.सुनील भोसले(पत्रकार),श्री.संजय भोसले,तसेच त्यांची मुलगी,स्नुषा,जावई,नातवंडे असा परिवार आहे.
  


Monday, July 28, 2014

मृदंगाचार्य सुनील मेस्त्री जपताहेत मेस्त्री घराण्याची परंपरा

मृदंगाचार्य सुनील मेस्त्री जपताहेत मेस्त्री घराण्याची परंपरा


-by Nitin Kalambe (8446329925)

एखादे शस्त्र,अस्त्र शिकताना ते शरीराचा भाग झाले पाहिजे अशी धारणा शिकणाऱ्याने ठेवली पाहिजे.त्याचप्रमाणे एखादे वाद्यसुद्धा  शरीराचा एक घटक बनू शकते याची खात्री रामदादा मेस्त्री यांच्या चरित्राचं अवलोकन केल्यावर दिसून येते.रात्री झोपल्यावर सुद्धा त्यांची बोटे हृदयाच्या ठोक्यावर नर्तन करीत असत.कधी कधी तर स्नान करतानाच ते वाजवण्यात इतके गर्क होत कि आपले स्नान चालू आहे याचा त्यांना विसर पडे मग कुणीतरी आठवण करून दिल्यावर ते भानावर येतं.साटमबुवा यांच्याकडे पखवाजाचं शास्त्रसुद्ध शिक्षण घेतलेल्या रामदादा मेस्त्री यांनी स्वत:ची स्वतंत्र शैली निर्माण केली.शंकर मेस्त्री आणि राम मेस्त्री या बंधुद्वयींनी उभा महाराष्ट्र आपल्या पखवाज वादनाने मंत्रमुग्ध केला.राम मेस्त्री यांनी आपल्या आयुष्यात पंडित भीमसेन जोशी यांची साथ केली,आकाशवाणीवर पखवाज वादनाचे केले, गजझंपा हा ताल वाजून हत्ती घोडे नाचवले इतकेच नव्हे तर जपानमध्ये जाऊन त्यांनी पखवाज या वाद्याची जपान्यांना भुरळ घातली.त्यांच्या शिष्यांमध्ये त्यांचा किती आदर केला जात होता हे एका उदाहरणावरून सहज स्पष्ट होण्यासारखे आहे.नारायण केसरकर हे रामदादा मेस्त्री यांच्याकडे पखवाज शिकायचे.रामदादांनी त्यांना सांगितले “हे बघ नारायण,तुला अजूनही खूप शिकायचे आहे तेव्हा मी सांगितल्याशिवाय तू समाजामध्ये वाजवायला बाहेर पडू नकोस”.काही काळाने रामदादांचे निधन झाले.कालपरत्वे नारायण केसरकर यांनी वादनात खूप प्रगती केली त्यांच्या वादनातून राम मेस्त्री यांचे वादन प्रतिबिंबित होते असं सुनील मेस्त्री सांगतात.परंतु “मी सांगितल्याशिवाय समाजात वाजवू नकोस” हा गुरूंचा आदेश नारायण केसरकरांनी गुरु गेल्यानंतरही पाळला.इतकी उच्च कोटीची कला हातात असूनसुद्धा गुरुवाक्य प्रमाण मानून ह्या शिष्याने कलियुगात गुरु-शिष्याचं आदर्श म्हणवलं जाईल असं उदाहरण समाजापुढे ठेवल आहे.”धन्य तो गुरु आणि धन्य तो शिष्य !”
रामदादा मेस्त्री,शंकर मेस्त्री यांच्या उत्कर्षाच्या काळात त्यांनी अनेक विद्यार्थी तयार केले.आताचे आघाडीचे पखवाज वादक प्रताप पाटील हे राम मेस्त्री यांचेच शिष्य.समाजाला भारावून टाकणार त्याचं वादन पाहून लहानग्या सुनीलला पखवाज शिकण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली.”काका आज अख्या महाराष्ट्रात विद्यार्थी तयार करता आहात पण तुम्ही मला कधी पखवाज शिकवणार ?” असा प्रश्न सुनीलने काकांना विचारला.तेव्हा राम मेस्त्रींनी जे उत्तर दिले ते आजही सुनील मेस्त्रींना जसेच्या तसे आठवते.ते म्हणाले “हे बघ सुनील,तुला पखवाज शिकवायची काहीच आवश्यकता नाही,तुझ्या रक्तातच ती कला भिनली आहे,तुला मी दोन वर्ष जरी शिकवले तरी तू असा तयार होशील की पखवाज वाजवण्यात तू मलाही मागे टाकशील ” आज हेच शब्द आशीर्वाद रूपाने ग्रहण करून सुनील मेस्त्रींची वाटचाल चालू आहे.
गावाकडे प्राथमिक शिक्षण घेऊन सुनील मेस्त्री चरितार्थासाठी घाटकोपर येथे आपल्या अंगभूत कलेचा वापर करून उत्तम फर्निचर बनवू लागले.येथेच त्यांना नारायण केसरकर यांच्याविषयी माहिती मिळाली त्यांचे वादन पाहून आता आपणही त्यांच्याकडे शिकायला जावे अशी सुप्त इच्छा त्यांच्या मनात आकार घेऊ लागली.अखेर नारायण केसरकर यांच्याकडे त्यांचे प्राथमिक शिक्षणाला सुरुवात झालीच.मुळच्या हिऱ्याला पैलू पडू लागले.गुरूंनी एक बोल शिकवावा आणि शिष्याने लगेच त्याची चौपट करून वाजवून दाखवावा असा प्रकार होऊ लागला.शेवटी एक दिवशी नारायण केसरकर म्हटले “सुनील,यापुढे मी तुला शिकवणार नाही,आता वेळ आली आहे,तू तुझ्या मूळ घराण्याकडे परत जा”.गुरुजींचा आशीर्वाद घेऊन सुनील मेस्त्री आपले काका शंकर मेस्त्री यांच्याकडे शिक्षण घेऊ लागले.दऱ्याखोर्यातून खळखळत,मेहनत घेऊन वाहत आलेलं पाणी मूळ समुद्राला मोठ्या आनंदात मिळालं,एकरूप झालं.काकांनी जीव लावून आपल्या पुतण्याला शिकवलं,अजूनही शिकवत आहेत.रक्ताच्या नात्यांचा हा मर्मबंध गुरु-शिष्याच्या नात्यात परावर्तीत झाला.
सूर्याला ढगांनी कितीही झाकोळले तरीसुद्धा स्व:सामर्थ्याने तो धुकट सारून आपल्या ठायीच्या तेजाने प्रकाश फाकू लागतो.त्याचप्रमाने सुनील मेस्त्री यांच्या वादनाने संगीतरुपी आसमंत दरवळून जाऊ लागला.गुरुवर्य फणसे बाबा घाटकोपर येथे सुनील मेस्त्रींचे वडील भाऊ मेस्त्रींना म्हणाले “तुमच्या सुनील ने आश्चर्यकारक अशी प्रगती केली आहे त्याचं वादन ऐकून जणू काही रामदादा मेस्त्री वाजवत आहेत असाच भास होतो तेव्हा तुमचा हा मुलगा समाजात आमच्यासोबत साथीला हवा”.भाऊ मेस्त्रींनी क्षणाचा विचार न करता त्यांना संकल्पपूर्वक उत्तर दिले “आज महाराष्ट्रात मेस्त्री बंधूद्वयींनी स्वत:चे घराणे निर्माण केले.आज मी वादन करतो परंतु त्यांच्याइतके शिक्षण माझे नाही त्यांची परंपरा सांभाळण्याची ताकद माझ्या वादनात नाही तेव्हा माझ्या या मुलाने राम मेस्त्री,शंकर मेस्त्रींचा पखवाज वाजवावा अशी माझी इच्छा आहे.ज्या पखवाजावरून रामदादा,शंकरदादा खाली बसतील तोच पखवाज सुनीलने वाजवावा,हा आज तुमच्यासमोर मी माझा मुलगा समाजाला वाहिला”.भाऊ मेस्त्रींच्या चेहऱ्यावर एक अपूर्व समाधान होते,म्हतारपणाची काठी वगैरे न मानता किंवा स्वत:चा कोणताही वैयक्तिक स्वार्थ न पाहता या माणसाने आपला पोटचा मुलगा समाजासाठी वाहिला होता,एक संकल्प त्यादिवशी सिद्धीस गेला आणि सुनील मेस्त्रींच्या रूपाने एक हिरा आज वारकरी संप्रदायाला आपल्या अंगच्या प्रकाशाने तालब्रह्मात न्हाऊ घालतो आहे.
यानंतर सुनील मेस्त्रीनी मागे वळून पहिले नाही.उत्तरोत्तर त्यांच्या प्रगतीचा आलेख उंचावता राहिला.अगणित प्रसिद्धी मिळून त्यांचे पाय जमिनीवरच राहिले.कलेच्या अहंकार न बाळगता माळ धारण करून वारकरी झाले.कोणत्याही मानधनाची त्यांनी कधीच अपेक्षा केली नाही.आज मानधनासाठी अडून बसणाऱ्या कलाकारांनी सुनील मेस्त्री यांच्या निस्वार्थी सेवेचा आदर्श ठेऊन वाटचाल करायला हवी.आज मुंबई,पुणे,पोलादपूर,महाड असे त्यांचे क्लासेस चालू आहेत परंतु एकाही विद्यार्थ्याकडे त्यांनी कधीही फी मागितली नाही.कलियुगात हि गोष्ट फार दुर्लभ मानावी लागेल.कलेचा बाजार त्यांनी कधीच मांडला नाही याऐवजी समाजाची सेवा म्हणून त्यांनी ही कला जोपासली,वाढवली.आपल्यामुळे आपल्यापर्यंत चालत आलेल्या परंपरेला बाधा पोचणार नाही याची त्यांनी पावलो-पावली काळजी घेतली.आज तालुक्यात त्यांच्याविषयी ज्या आदराने चर्चा चालतात हे त्यांच्या या वैराग्यरुपी सेवेचं फलित आहे.

     

महाडमध्ये एस.टी.बस –टाटा लक्झरीची समोरासमोर टक्कर

महाडमध्ये एस.टी.बस –टाटा लक्झरीची समोरासमोर टक्कर

१९ प्रवासी जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक


पोलादपूर(नितीन कळंबे) – गोरेगाव स्थानकातून सकाळी आठ वाजता सुटलेली बस नेहमीप्रमाणे महाडमध्ये नोकरी निमित्त येणारे कर्मचारी आणि शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी घेऊन गांधारपाले येथे आली.गेले काही दिवसांपासून खालच्या जुन्या रस्त्याने जाणारी गाडी ड्रायव्हरने आजच हायवे-वरून महाडच्या दिशेने दामटली इतक्यात एका अवघड वळणावर समोरून येणाऱ्या टाटा एजीसीएल बसला या एस.टी.ने समोरासमोर धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होता की बसचा पुढील सर्व भाग चेपून गेला तर बस चा दरवाजा तुटून टाटा एजीसीएल च्या गाडीमध्ये अडकून बसला.
टाटा एजीसीएल ही गाडी गोव्याहून उरणच्या दिशेने चालली होती.या गाडीचे स्टेरिंग डाव्या बाजूस असल्याने गाडीचा चालक दिलीप शिरोडकर(विचोली,गोवा) हा थोडक्यात बचावला तर एस.टी.बस चा चालक सुरेंद्र बाबा पाटील(माणगाव) हा गंभीर जखमी झाला.ह्या धडकेची तीव्रता जास्त असल्याने पुढील सीट वर आदळून अठरा प्रवाशी जखमी झाले.यामध्ये सुवर्णा सुदाम निकम(केंबूर्ली) हिचे डोके काचेवर जोरात आदळल्याने काचा डोक्यात शिरून ती जागेवरच बेशुद्ध झाली.तिला महाड मधील ट्रामा केअर सेंटर मध्ये हलवण्यात आले.परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उचारासाठी तिला मुंबई येथील सायन रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातात वाहक आकाश मनोहर खैरे(वय २२,श्रीवर्धन),श्वेता सुरेश निकम (वय १६,केंबूर्ली),रसिका अनिल खानविलकर (वय २१,गोरेगाव),हरिश्चंद्र अर्जुन भोनकर (वय ४५),राजू मनोहर महाडिक(३८, गांधारपाले),रविकांत दिनकर पिंगळे(४७, गांधारपाले),चंद्रकांत दिनकर पिंगळे (२३,गांधारपाले),कामिनी भागवत (२१,गोरेगाव ),नवीन जैन(१८,गोरेगाव),समीर बोधीलकर (१९,गोरेगाव),रुक्सार अब्दुलगणी डावरे(२३,गोरेगाव),स्वप्नाली हनुमंत अडसूळ (१७,गोरेगाव),तस्नीम यासीन संगे(२४,गोरेगाव) इ.जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महाड आगारप्रमुख देवधर,वाहतूक नियंत्रक अंबुर्लेकर तातडीने घटनास्थळी पोचले.क्रेन ने एस.टी.बाजूला करून अर्धा तास ठप्प असणारा महामार्ग मोकळा केला गेला.जखमींना एस.टी.महामंडळाकडून तातडीने मदत जाहीर करण्यात आली.



राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्षासहल उमरठ येथे संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्षासहल उमरठ येथे संपन्न

पोलादपूर (नितीन कळंबे) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी वर्षासहलीचे आयोजन करण्यात येते.एखादे ऐतिहासिक स्थळ निवडून त्याठिकाणी व्याख्याने,विविध खेळ यांचे आयोजन केले जाते.

गेल्यावर्षी मुरुड येथील कोर्लई किल्ल्यावर वर्षासहलीचे आयोजन करण्यात आले होते,तर या वर्षी पोलादपूर तालुक्यातील उमरठ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी ही वर्षासहल संपन्न झाली.परवा (दि.२६)रोजी रायगड जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख कौस्तुभ सोहनी यांनी व्याख्यानाद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती स्वयंसेवकांना समजावून सांगितली.दि.२७ रोजी सकाळी मैदानात कबड्डी,कुस्ती सारखे मर्दानी खेळ खेळण्यात आले.यानंतर वर्षासहलीची सांगता पराग कंगले (बौद्धिक प्रमुख-कोकण प्रांत) यांच्या व्याख्याने झाली.व्याख्यानामध्ये त्यांनी आगामी काळातील भारतासमोरील आव्हाने यावर स्वयंसेवकांशी संवाद साधला.मा.चंद्रकांत कळंबे (जि.प.उपाध्यक्ष) यांनी उपस्थित स्वयंसेवकांना नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास समजावून सांगितला.याप्रसंगी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून १३० स्वयंसेवक उपस्थित होते.   

पोलादपुरचे सुपुत्र लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित “टपाल” चित्रपट लवकरच होणार प्रकाशित

पोलादपुरचे सुपुत्र लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित “टपाल” चित्रपट लवकरच होणार प्रकाशित

ब्लू,कौन बनेगा करोडपती,बॉस,इंग्लिश-विंग्लिश मध्ये 

सिनेमॅटोग्राफी लक्ष्मण उतेकर यांची

पोलादपूर(नितीन कळंबे) –मोबाईल,संगणक.सोशल मिडिया 

यांच्या जंजाळात पोस्टमन ही संकल्पना 

मागे पडताना दिसत आहे.मात्र खासकरून ग्रामीण जीवनात 

पोस्टमनच्या भावनिक वलय लाभलेल्या 

भूमिकेतून हृदयस्पर्शी,नात्यांची मार्मिक गुंफण असलेली कथा 

घेऊन टपाल हा चित्रपट २६ सप्टे.२०१४ 

रोजी प्रकाशित होत आहे. मैत्रेयी मास मिडिया यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाची कथा “टिंग्या 

फेम” मंगेश हाडवळे यांनी लिहिली असून वीणा जामकर,नंदू माधव,मिलिंद गुणाजी यांनी त्यात 

अभिनय केला आहे.

लक्ष्मण उतेकर हे पोलादपूर मधील मोरसडे या गावातील आहेत.”टपाल” या चित्रपटात प्रमुख भूमिका 


याच मोरसडे या गावातील दोन लहान मुलांनी केली आहे.या मुलांनी अभिनयाचे कुठलेही तांत्रिक 

शिक्षण घेतले नसतानाही लक्ष्मण उतेकर यांनी त्यांना संधी देऊन त्यांच्याकडून सशक्त अभिनय 

करवून घेतला आहे.यासाठी त्यांच्या अभिनयाच्या कार्यशाळेची जबाबदारी ही लक्ष्मण उतेकर यांनीच 

घेतली. स्वत: लक्ष्मण यांनीसुद्धा छायाचित्रणाचे कोणतेही तंत्रशुद्ध प्रशिक्षण घेतलेले नाही.जयंत ब्रदर्स 

या स्टुडीओ मध्ये ऑफिस बॉय म्हणून काम करत असताना कॅमेरा लोकेशन वर ने-आण करायची 

जबाबदारी त्यांची होती.त्यामुळे शुटींग संपेपर्यंत त्यांना लोकेशन वर थांबावे लागे,याच दरम्यान 

त्यांनी कॅमेरा हाताळणीकडे लक्ष देण्यास सुरुवात केली आणि एकलव्याच्या भूमिकेतून त्यांनी १६ वर्षे 

मिळालेल्या अनुभवाच्या जोरावर आज हिन्दी चित्रपटसृष्टीत स्वत:चे स्थान मिळवले आहे.अमिताभ 

बच्चन यांच्या “कौन बनेगा करोडपती” च्या जाहिरातींचे चित्रण,”आयडिया” या कंपनीच्या 

जाहिरातीचे 

चित्रण तसेच अक्षय कुमार याच्या “ब्लू” आणि “बॉस” तसेच गौरी शिंदे यांच्या “इंग्लिश -विंग्लिश” 

इ.चित्रपटांचे छायाचित्रण लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे.


चित्रपट रिलीज होण्याअगोदरच राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर याला भरभरून प्रतिसाद 

मिळाला.जानेवारी मध्ये पार पडलेल्या थर्ड आय एशियन फिल्म फेस्टिवल आणि १२व्या पुणे 

आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखविण्यात आला. पुणे इंटरनॅशनल फिल्म 

फेस्टीव्हलमध्ये मध्येसुद्धा या चित्रपटाला भरभरून पप्रोत्साहन मिळाले.इंडियन इंटरनेशनल फिल्म 

फेस्टिवल ऑफ साउथ आफ्रिका या पुरस्कार सोहळ्यात वीणा जामकर यांनी टपाल चित्रपटातील 

भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. महाराष्ट्र शासन व पुणे फिल्म 

फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने बाराव्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात  टपाल या 

चित्रपटाची निवड झाली आहे.  दक्षिण आफ्रिकेत होणार्‍या भारतीय चित्रपट महोत्सवातही "टपाल" ची 

निवड झाली आहे. सिडनी, फ्रान्समधील वेसोल, अमेरिकेतील लॉस एंजिल्स, इटली, जर्मनी, चीन या 

देशांमधूनही "टपाल" ला निमंत्रण मिळाले आहे.



तालुक्यातील सुपुत्राने जगाच्या नकाशावर इतके दैदिप्यमान यश मिळवून सुद्धा स्थानिक प्रशासन 

याबाबतीत उदासीन दिसते.तालुक्यातर्फे त्यांचे कोणत्याही प्रकारचे कौतुक केले जात नाही.आमसभेत 

त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही कधी घेतला गेला 

नाही.त्यांच्या या यशाबद्दल सुद्धा अगदी 

मोजक्याच 


लोकांना माहित आहे.लोकप्रतिनिधींच्या निव्वळ 

“राजकारण एके राजकारण“ या भूमिकेमुळे 

अयोध्या 

असूनही लक्ष्मण वनवासीच असल्याचे विदारक चित्र दिसून येत आहे. 

Sunday, July 27, 2014

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्षासहल उमरठ येथे संपन्न

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची वर्षासहल उमरठ येथे संपन्न

पोलादपूर (नितीन कळंबे) – राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे दरवर्षी वर्षासहलीचे आयोजन करण्यात येते.एखादे ऐतिहासिक स्थळ निवडून त्याठिकाणी व्याख्याने,विविध खेळ यांचे आयोजन केले जाते.

गेल्यावर्षी मुरुड येथील कोर्लई किल्ल्यावर वर्षासहलीचे आयोजन करण्यात आले होते,तर या वर्षी पोलादपूर तालुक्यातील उमरठ मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीस्थळी ही वर्षासहल संपन्न झाली.परवा (दि.२६)रोजी रायगड जिल्हा महाविद्यालयीन प्रमुख कौस्तुभ सोहनी यांनी व्याख्यानाद्वारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची कार्यपद्धती स्वयंसेवकांना समजावून सांगितली.दि.२७ रोजी सकाळी मैदानात कबड्डी,कुस्ती सारखे मर्दानी खेळ खेळण्यात आले.यानंतर वर्षासहलीची सांगता पराग कंगले (बौद्धिक प्रमुख-कोकण प्रांत) यांच्या व्याख्याने झाली.व्याख्यानामध्ये त्यांनी आगामी काळातील भारतासमोरील आव्हाने यावर स्वयंसेवकांशी संवाद साधला.मा.चंद्रकांत कळंबे (जि.प.उपाध्यक्ष) यांनी उपस्थित स्वयंसेवकांना नरवीर तानाजी मालुसरे यांचा इतिहास समजावून सांगितला.याप्रसंगी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून १३० स्वयंसेवक उपस्थित होते.   

Saturday, July 19, 2014

महाडमध्ये एस.टी.बस –टाटा लक्झरीची समोरासमोर टक्कर

महाडमध्ये एस.टी.बस –टाटा लक्झरीची समोरासमोर टक्कर
१९ प्रवासी जखमी तर एकाची प्रकृती चिंताजनक

पोलादपूर(नितीन कळंबे) – गोरेगाव स्थानकातून सकाळी आठ वाजता सुटलेली बस नेहमीप्रमाणे महाडमध्ये नोकरी निमित्त येणारे कर्मचारी आणि शाळा-कॉलेजमधील विद्यार्थी घेऊन गांधारपाले येथे आली.गेले काही दिवसांपासून खालच्या जुन्या रस्त्याने जाणारी गाडी ड्रायव्हरने आजच हायवे-वरून महाडच्या दिशेने दामटली इतक्यात एका अवघड वळणावर समोरून येणाऱ्या टाटा एजीसीएल बसला या एस.टी.ने समोरासमोर धडक दिली.हा अपघात एवढा भीषण होता की बसचा पुढील सर्व भाग चेपून गेला तर बस चा दरवाजा तुटून टाटा एजीसीएल च्या गाडीमध्ये अडकून बसला.
टाटा एजीसीएल ही गाडी गोव्याहून उरणच्या दिशेने चालली होती.या गाडीचे स्टेरिंग डाव्या बाजूस असल्याने गाडीचा चालक दिलीप शिरोडकर(विचोली,गोवा) हा थोडक्यात बचावला तर एस.टी.बस चा चालक सुरेंद्र बाबा पाटील(माणगाव) हा गंभीर जखमी झाला.ह्या धडकेची तीव्रता जास्त असल्याने पुढील सीट वर आदळून अठरा प्रवाशी जखमी झाले.यामध्ये सुवर्णा सुदाम निकम(केंबूर्ली) हिचे डोके काचेवर जोरात आदळल्याने काचा डोक्यात शिरून ती जागेवरच बेशुद्ध झाली.तिला महाड मधील ट्रामा केअर सेंटर मध्ये हलवण्यात आले.परंतु प्रकृती चिंताजनक झाल्याने पुढील उचारासाठी तिला मुंबई येथील सायन रुग्णालयात हलवण्यात आले.
या अपघातात वाहक आकाश मनोहर खैरे(वय २२,श्रीवर्धन),श्वेता सुरेश निकम (वय १६,केंबूर्ली),रसिका अनिल खानविलकर (वय २१,गोरेगाव),हरिश्चंद्र अर्जुन भोनकर (वय ४५),राजू मनोहर महाडिक(३८, गांधारपाले),रविकांत दिनकर पिंगळे(४७, गांधारपाले),चंद्रकांत दिनकर पिंगळे (२३,गांधारपाले),कामिनी भागवत (२१,गोरेगाव ),नवीन जैन(१८,गोरेगाव),समीर बोधीलकर (१९,गोरेगाव),रुक्सार अब्दुलगणी डावरे(२३,गोरेगाव),स्वप्नाली हनुमंत अडसूळ (१७,गोरेगाव),तस्नीम यासीन संगे(२४,गोरेगाव) इ.जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच महाड आगारप्रमुख देवधर,वाहतूक नियंत्रक अंबुर्लेकर तातडीने घटनास्थळी पोचले.क्रेन ने एस.टी.बाजूला करून अर्धा तास ठप्प असणारा महामार्ग मोकळा केला गेला.जखमींना एस.टी.महामंडळाकडून तातडीने मदत जाहीर करण्यात आली.



खोपड येथील मोरझोतावर पर्यटकांची तुफान गर्दी

खोपड येथील मोरझोतावर पर्यटकांची तुफान गर्दी

पोलादपूर(नितीन कळंबे) –पूर्ण पोलादपुर तालुक्यातून वर्षासहल जर काढायची असेल तर मोरझोत धबधब्याला भेट दिल्याशिवाय तुमची सहल सुफळ,संपूर्ण निश्चितच होणार नाही.सह्याद्रीच्या कुशीतून धाव घेऊन उंचावरून जमिनीवर बेफामपणे आदळणारे जलप्रपात पोलादपूरमध्ये काही कमी नाहीत परंतु या सगळ्यांमध्ये स्वत:चे वेगळे अस्तित्व राखून असलेला खोपड-चांदके गावांच्या सीमेवरील फेसाळता मोरझोत धबधबा कित्येक वर्षांपासून पर्यटकांचे आकर्षण ठरत आहे.
पोलादपूरपासून सुमारे बावीस किलोमीटरवर असलेला मोरझोत हा पर्यटकांचा “ऑल-टाईम फेवरेट” धबधबा आहे.तब्बल एक महिना हुलकावणी दिलेल्या पावसाने पर्यटकांच्या उत्साहावर जवळ-जवळ पाणी फिरवल्याचे दिसून येत होते.मुंबई-पुण्यातून खास मोरझोतवर येणाऱ्या चाकरमाने पर्यटक गावाकडे फोन करून सातत्याने “मोरझोताला पाणी आले कि नाही ?” अशी चौकशी करत होते.फेसबुकवर गेल्यावर्षीचे मोरझोतचे फोटो अपलोड होत होते.चांदके येथील आदिवासी बांधवांना या निमित्ताने जी रोजगाराची संधी निर्माण होते ती संधी देखील निसर्गाने हिरवल्याचीच चिन्हे दिसून येत होती.

गेला आठवडाभर सुरु असलेल्या संततधार पावसाने मोरझोत बेफामपणे पर्वताराजींवरून उद्या घेत खाली कोसळू लागला.चाकरमाने सुट्ट्या कधी मिळतात याची संधी पाहू लागले,काहींनी त्यांचे वीकेंड खास मोरझोत साठी राखून ठेवले,कॉलेज मधील मुले-मुली सुट्ट्यांच्या दिवसात तर कधी सरळ कॉलेजला दांडी मारून मोरझोत वर मौजमजा करताना दिसून येऊ लागली.काही हौशी तरुण पुण्या-मुंबईहून वाद्य,डी.जे.,बाजा,स्पीकर घेऊन येतात आणि बेभानपणे नृत्य करताना दिसून येतात.

हा धबधबा इतर धबधब्यांपेक्षा सुरक्षित मानला जातो.येथील पाण्याला अजिबात खोली नाही.तसेच डोंगरावरून दोन टप्प्यांतकोसळल्याने पाण्याचा प्रवाह तितकासा जोरदार नसतो याचा फायदा घेऊन काही अति-उत्साही पर्यटक थेट धबधब्याखाली उभे राहून वेगाने खाली येणारे पाणी अंगावर घेणे पसंत करतात.दगडांची संख्या जास्त असल्याने पाय जपून टाकले नाहीत तर घसरण्याचा संभव असतो तसेच काही बेजबाबदार मद्यपींनी दारूच्या बाटल्या फोडल्याने काचांपासून सांभाळावे लागते.

निसर्गाने सौंदर्याच दान पोलादपूरच्या पदरात भरभरून दिलं आहे याची प्रचीती येते.कड्यावरून कोसळून मध्येच उसळी घेणारा फेसाळता धबधबा मंद मंद वाहणारी हवा ओलीचिंब करून टाकतो,समोरील रस्त्यावर उभे राहिल्यास स्पर्श करणारे तुषार अंगावर शहारे आणतात.काही पर्यटक धबधब्याच्या आतील अंगाला असलेल्या गुहेतून समोर कोसळणाऱ्या धबधब्याचे फोटो काढण्याचे धाडस करतात.या पावसाळ्यात सर्वांनी जरूर या धबधब्याचा आनंद घ्यावा आणि आपल्या वर्तवणुकीने इतरांच्या आनंदाला बाधा येणार नाही,निसर्गाची हानी होणार नाही याची काळजी घ्यावी.   

Wednesday, July 16, 2014

सद्गुरू दादामहाराज मोरे माऊली यांचा गुरुपोर्णिमा सोहळा उद्या

सद्गुरू दादामहाराज मोरे माऊली यांचा गुरुपोर्णिमा सोहळा उद्या

 
पोलादपूर(नितीन कळंबे)-महाराष्ट्र वारकरी महामंडळ मुंबई शाखेचे अध्यक्ष वै.ह.भ.प.ज्ञानेश्वर मोरे माऊली यांचा अध्यात्मिक वारसा समर्थपणे पेलून वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्रभर प्रचार व प्रसार करणारे त्यांचे सुपुत्र ह.भ.प.दादामहाराज मोरे माऊली यांच्या गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम उद्या (दि.१७) रोजी पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे हॉल मध्ये संपन्न होईल.


सद्गुरू मोरे माऊली वारकरी सेवा समिती(कोकण विभाग) यांनी आयोजित केलेला हा कार्यक्रम सकाळी ९ वाजता गुरुपरंपरेच्या अभंगांवर होणाऱ्या सांप्रदायिक भजनाने सुरु होईल.११ वाजता ह.भ.प.ज्ञानेश्वर मोरे माऊली यांच्या प्रतिमेचे अनावरण जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे यांच्या हस्ते होईल यानंतर सद्गुरू दादामहाराज मोरे यांच्या प्रवचनाचा लाभ भाविकांना घेता येणार आहे.दुपारी एक ते दोन या वेळात सद्गुरू दर्शन सोहळ्यानंतर महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.तरी सर्वांनी गुरुपुजनाच्या सोहळ्यास उपस्थित राहून तीर्थप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन सद्गुरू मोरे माऊली वारकरी सेवा समिती(कोकण विभाग) यांच्या मार्फत करण्यात आले आहे. 

Monday, July 14, 2014

Article by Nitin kalambe


News of virtual dindi by Swapnil More



Accident in Poladpur news by Nitin kalambe published in Raigad Times (14-7-2014)


Tuesday, July 8, 2014

सूर्याजी मालुसरे समाधीस्थळ ...साखर ता.पोलादपूर,जि.रायगड


खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता

खड्ड्यामुळे अपघात होण्याची शक्यता 


पोलादपूर(नितीन कळंबे )- पोलादपूर येथील प्रभातनगर मध्ये हॉटेल गोल्डन पेलेस च्या बाजूने सहानेकडे जाणारा कच्चा रस्ता एका खड्यामुळे धोकादायक बनला आहे.सदर खड्डा हा आकाराने जरी मोठा नसला तरीसुद्धा येथील लहान विद्यार्थ्यांची ये-जा बघता हा चिंतेच्या विषय ठरत आहे.

हा खड्डा गटावरील स्लब तुटल्यामुळे तयार झाला आहे.आकाराने इतका मोठा नसला तरी आतमध्ये पाय पडल्यास सळईमध्ये अडकून पाय मोडण्याची भीती आहे .इथून केवळ दहा पाऊले अंतरावर सिद्धगिरी संस्थेची यशवंतराव इंग्लिश मेडियम ही शाळा आहे.त्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावर मुले येथून ये-जा करतात.तसेच प्रभातनगर,हनुमान नगर,भैरवनाथ नगर सिद्धार्थनगर येथील मुले जनसेवा प्रतिष्ठान,तालुका शाळेत जाताना मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर हाच रस्ता वापरतात तसेच नागरिक बाजारपेठेत जाताना सर्रासपणे याच रस्त्याचा वापर करतात.

रामजानकी अपार्टमेंट तसेच शगुन अपार्टमेंट मधील मुले येथे खेळताना दिसून येतात त्यामुळे कोणती अनुचित घटना घडण्याआधी ग्रामपंचायतीने याकडे तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी परिसरातील नागरिक करत आहेत.

पोलादपूर तालुका वाचनालय वाचकांच्या प्रतीक्षेत

पोलादपूर तालुका वाचनालय वाचकांच्या प्रतीक्षेत 


पोलादपूर(नितीन कळंबे) - "ग्रंथ हेच मानवाचे मित्र" असं म्हटलं जातं.पुस्तके ही मानवी जीवन समृद्ध करण्यास मदत करतात.वाचनामुळे ज्ञानात वाढ होते,भाषा समृद्ध होते,वाचनामुळे अनेक व्यक्तींच्या आयुष्यात महत्वपूर्ण बदल घडून आले आहेत तसेच कित्येक लोकांचा जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला आहे परंतु आजकाल सोशल मिडियाच्या माऱ्यापुढे वाचनसंस्कृती कमी झाल्याचे दिसून येत आहे.

पोलादपूर येथील तालुका वाचनालय १९७० मध्ये स्थापन झाले.ग्रंथालय संचालनालय-महाराष्ट्र राज्य,मुंबई अंतर्गत असणारे हे वाचनालय विविध विषयांवर असलेल्या पुस्तकांनी समृद्ध आहे.यामध्ये धार्मिक ग्रंथ,माहितीपर पुस्तके,ऐतिहासिक पुस्तके,काव्य आणि नाट्यविषयक पुस्तके,स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन करणारी पुस्तके,विविध विषयांवरील कादंबऱ्या,चरित्रे,आत्मचरित्रे,माहितीकोश,बालसाहित्य,कथासंग्रह,शासकीय योजनांची माहिती देणारी पुस्तके,प्रत्येक व्यावसायिक क्षेत्राशी निगडीत असणारी पुस्तके,व्यक्तिचित्रणे,कला तसेच संगीताशी निगडीत पुस्तके,व्यावहारिक पुस्तके,पाककला,संगणक ज्ञान, अशा प्रकारच्या एकूण चौदा हजार पुस्तकांचा समावेश होतो.ही पुस्तके प्रामुख्याने मराठी तसेच हिंदी,इंग्रजी भाषेत उपलब्ध आहेत.

लोकमत,सकाळ,लोकसत्ता सह सोळा दैनिक वृत्तपत्र,सोळा साप्ताहिके, सोळा मासिके तसेच दिवाळी अंक येथे वाचावयास मिळतात.वृत्तपत्रांचे वाचन करण्यासाठी येथे स्वतंत्र वृत्तपत्र कक्ष आहे.

येथील सभासदत्वासाठी एका महिन्याचे केवळ दहा रुपये इतके नाममात्र शुल्क आकारले जाते.सर्व पुस्तकांचे वर्गीकरण केल्यामुळे पुस्तके शोधणे सोपे जाते.सावित्री नदीची खळखळ ऐकत येथे बसून पुस्तक वाचण्याची मजा काही औरच..! सकाळी साडेआठ ते दहा तर संध्याकाळी साडेचार ते सात या वेळात वाचनालय चालू असते तर सोमवार हा सुट्टीचा दिवस असतो.काही अडचण आल्यास येथील ग्रंथपाल निकिता शेठ,लिपिक महाडिक तसेच शिपाई कीर्ती नगरकर मदत करण्यास सदैव तत्पर असतात.

वाचनाची सवय ही बालकांना लहानपणापासून लावणे अतिशय गरजेचे आहे.लहानपणी लावलेली सवय ही टिकून राहून मुले मोठेपणी अधिकाधिक वाचनासाठी प्रवृत्त होतात असे संशोधनातून आढळून आले आहे.लहानपणी गोष्टीची पुस्तके वाचण्याची सवय लावलेल्या मुलांमध्ये जवळजवळ नव्वद टक्के मुलांमध्ये नंतर मोठेपणी वाचनाची आवड स्वयंप्रेरणेने निर्माण होते.त्यामुळे भावी पिढी सुसंस्कृत करण्यासाठी वाचनसंस्कृती जपणे गरजेचे आहे.लहानपणीच वाचनप्रक्रियेतील आनंदाची ओळख झाली नाही,वाचनाची आवड रुजली नाही तर मात्र एका सुंदर अनुभूतीला ही मुले कायमची मुकतील.

मोबाईल वाचनालये,इंटरनेट वरील ऑनलाईन वाचनालये,गाडीवरील फिरती वाचनालये,ई-बुक्स इ.येनकेन प्रकारे समाजाला वाचनाची सवय लावण्यासाठी झटत असतात मात्र एवढे सुसज्ज वाचनालय असून सुद्धा त्याकडे पोलादपूरकरांनी साफ दुर्लक्षच केल्याचे दिसून येत आहे.चौऱ्याहत्तर टक्के सुशिक्षित असलेल्या या तालुक्यात अर्धा टक्काही वाचक नाहीत यापेक्षा दुर्दैव आणखी काय असू शकेल ?

सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्याच आरोग्याशी खेळ

सफाई कर्मचाऱ्यांकडून स्वतःच्याच आरोग्याशी खेळ


महाड/नितीन कळंबे (दि.२) - महाड नगरपरिषदेतील आरोग्य विभागाच्या सफाई कर्मचाऱ्यांना गमबूट,हातमोजे इत्यादी साहित्य आरोग्यविषयक सुरक्षेसाठी दिलेले असतानाही सफाई-कर्मचारी मात्र त्याचा उपयोग करताना दिसून येत नाहीत त्यामुळे अनेक दुर्धर आजारांना त्यांना तोंड द्यावे लागत आहे.

सफाई करताना अनेक प्रकारच्या घटक जीवजंतुंशी कामगारांचा संपर्क येतो.सडलेले अन्न,कुजलेल्या भाज्या,जनावरांचे मलमूत्र,प्लास्टिक इत्यादी अनेक पदार्थ उचलताना सफाई कामगारांनी हातमोजे घालणे ही अत्यावश्यक बाब आहे तसेच तोंडावाटे जंतूंचे होणारे मार्गक्रमण रोखण्यासाठी नाक आणि तोंड  स्कार्फने झाकणे आवश्यक आहे.नाली-गटारांची सफाई करताना पायात कोणती वस्तू लागून जखमा होऊ नयेत म्हणून त्यांना गमबूट पुरवले जातात मात्र वरील साधने उपलब्ध असूनही महाड मधील सफाई कर्मचारी याकडे साफ दुर्लक्ष करताना दिसून येत आहेत.याबाबत एका सफाई कर्मचाऱ्याकडे विचारणा केली असता गमबूट आणि हातमोजे घालणे ही त्याच्या दृष्टीने महत्वाची बाब नसल्याचे त्याने सांगितले त्यामुळे पुरवण्यात आलेल्या साहित्याबरोबर कर्मचाऱ्यांमध्ये आरोग्यविषयक समुपदेशन करणे महत्वाचे बनले आहे.




अचानक आलेल्या पावसाने महाडकरांची उडवली तारांबळ

अचानक आलेल्या पावसाने महाडकरांची उडवली तारांबळ

पोलादपूर\नितीन कळंबे-"ये रे ये रे पावसाचा" राग आळवत असताना आज पाउस खरच आला.सुमारे दहा मिनिटे कोसळलेल्या या धो-धो पावसाने महाडकरांची चांगलीच तारांबळ उडवली.

पावसाची आतुरतेने वाट पाहणारा बळीराजा या पावसाने अल्पकाळ हा होईना सुखावला.राब कोमेजून जाण्याच्या तसेच पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर हा पाउस आशेचा किरण दाखवणारा ठरला.मात्र अचानक आलेल्या या पावसाने छत्री न घेता बाहेर पडलेल्या बेसावध नागरीकांना चांगलेच भिजवून टाकले.

रस्त्यावरील फळविक्रेत्यांनी पावसाला थोपवून धरण्यासाठी मोठ्या छत्र्या,मेणकापड,मोठे प्लास्टिक यांची तजवीज केली होती.मात्र रस्त्याच्या दुतर्फा रानभाजी,रानमेवा विकण्यास बसलेल्या आदिवासी स्त्रिया मात्र टोपल्या तिथेच टाकून आडोसा शोधण्यासाठी एकच धावपळ करताना दिसत होत्या.विद्यार्थी दप्तरातील वह्या-पुस्तके भिजू नयेत म्हणून दुकानांच्या छताखाली गर्दी करत होते. मात्र दहा मिनिटातच हा पाउस थांबला आणि लगेचच नेहमीसारखे कडक ऊन पडले.